निर्यात आणि दरातील घसरणीचा थाई साखर उद्योगावर परिणाम

नवी दिल्ली: थाई साखर उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. साखर उद्योगाच्या विशेषज्ञांनी सांगितले की, निर्यातीची कमी आणि दरात होणारी घसरण याचा परिणाम थाई साखर उद्योगावर होत आहे. जागतिक बाजारात साखरेच्या किंमतीत होणारी घट हे साखर उद्योगासाठी मोठे संकट आहे. या किंमती सध्या $0.22- $0.24 प्रति किलो पर्यंत घसरल्या आहेत, या गेल्या सहा वर्षातील सगळ्यात कमी किमती आहेत.

काही देशांचे म्हणणे असे आहे की, भारतातून वाढलेल्या साखरेच्या निर्यातीमुळे जागतिक बाजारातील साखरेच्या किमतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यात थाईलंडची साखर निर्यात 2017 च्या दरम्यान 7.212 मिलियन पेक्षा कमी होवून 6.067 मिलियन टन झाली आहे. त्यांच्या प्रमुख ग्राहकांमध्ये कंबोडिया, इंडोनेशिया, तैवान आणि म्यानमार यांचा समावेश होता, ज्यांनी आपले आयातीचे प्रमाण कमी केले आहे.

नुकतेच, आंतरराष्ट्रीय साखर संघटना (आयएसओ) यांनी 2 सप्टेंबर ला आपल्या अहवालात, भारत आणि थाईलंड मधील कमी उत्पादनामुळे जागतिक बाजारात 4.76 मिलियन टन साखर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here