थानाभवन कारखान्याकडून गेल्या हंगामातील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

शामली : ऊन साखर कारखान्यापाठोपाठ थानाभवन साखर कारखान्यानेही गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाची पूर्ण थकबाकी अदा केली आहे. दोन्ही साखर कारखान्याने चालू हंगामातील बिले देण्यासही सुरुवात केली आहे.

शामली कारखान्याकडे अद्याप गेल्या हंगामातील ११.७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये तिन्ही साखर कारखान्यांनी ११४२.९६ कोटी रुपये किमतीच्या ३५५.१४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. मे महिन्यात गळीत हंगाम संपुष्टात आला. आतापर्यंत ११३१.२५ कोटी रुपयांची बिले अदा झाली आहेत. गळीत हंगामा २०२१-२२ ची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. आतापर्यंत ४७४.५८ कोटी रुपयांची १६१.०४ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. या पैकी ऊन साखर कारखान्याने दहा कोटी रुपये तर थानाभवन कारखान्याने ८.५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर उर्वरीत ४५५.९९ कोटी रुपये थकीत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, बजाज ग्रुपच्या सहयोगी वीज कंपनी यूपीपीसीएलकडे जी थकबाकी होती, त्यातून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

थानाभवनच्या बजाज ग्रुपच्या कारखान्याकडून साखर विक्री करून काही बिले दिली आहेत. शामली कारखानाही लवकरच शेतकऱ्यांना आधीच्या हंगामातील पैसे देईल. त्यानंतर चालू गळीत हंगामातील पैसे शेतकऱ्यांना मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here