ऊस माफियांवर आता बसणार लगाम

मोदीनगर : ऊस विभागाने आता ऊस माफियांवर लगाम घालण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी गाळप हंगाम 2019-20 मध्ये बनलेल्याल सर्व सदस्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पडताळणी दरम्यान ज्या शेतकर्‍यांचा अभिलेख चुकीचा असेल त्याची सदस्यता रद्द करण्यात येईल.

तिबडा रोड स्थित सहकारी ऊस विकास समितीचे सचिव अजय प्रताप सिंह यांनी सागितले की, गाळप हंगाम 2019-20 मध्ये समिती चे अनेक नवे सदस्य बनले आहेत. यामद्ये काही लोकांची पडताळणी केली आहे. आतापर्यंत कोणत्याही दस्तावेजमध्ये त्रुटी समोर आलेली नाही. पण आता अनेक असे सदस्य आहेत, ज्यांची पडताळणी करणे बाकी आहे. त्यांनी सांगितले की, काही जिल्ह्यामध्ये पडताळणी दरम्यान दस्तावेजांमध्ये त्रुटी मिळाल्या आहेत. ज्यानंतर त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. हे पाहता ऊस आयुक्त यांच्याकडून राज्यातील सर्व समिती सचिवांना निर्देश दिले आहेत की, सदस्यांची पडताळणी करावी. त्यांनी सागितले की, आता 2020-21 मध्ये बनणार्‍या नव्या सदस्यांचा सट्टा ही तेव्हाच संचलित होईल. जेव्हा त्यांची शंभर टक्के पडताळणी पूर्ण होईल. हे पाउल ऊस माफियांवर प्रभावी लगाम घालण्यासाठी उचलले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here