दोन नोव्हेंबरपासून सुरु होणार बागपत आणि रमाला साखर कारखाना

बागपत, उत्तर प्रदेश: साखर कारखाने सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. डीसीओ डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, बागपत आणि रमाला येथील सहकारी साखर कारखाने दोन नोव्हेंबर व मलकापूर साखर कारखाना 31 ऑक्टोबर ला सुरु होणार आहे. तीनही साखर कारखान्यांमध्ये नव्या गाळप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

उल्लेखनीय आहे की, बागपतमध्ये 74 हजार हेक्टर जमीनीवर ऊस लागवड केली जाते. एक लाख शेतकरी साखर कारखाना सुरु होण्याची तिव्रतेने वाट पाहात आहेत. तर 512 करोड रुपये इतकी थकबाकी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here