जिल्हाधिकार्‍यांनी साखर कारखान्यांना दिले उर्वरीत एफआरपी भागवण्याचे आदेश

सोलापुर: जिल्ह्यामध्ये गाळप हंगाम सुरु होवून एक महिन्या झाला आहें, तरीही कोणत्याही साखर कारखान्याने आतापर्यंत एफआरपी दराची घोषणा केलेली नाही. अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात एफआरपी पेक्षा कमी रक्कम जमा केली आहे. दरम्यान शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एफआरपी भागवण्याबाबत साखर कारखान्यांविरोधात तक्रारी येत आहेत. या तक्रारी लक्षात घेवून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ज्या कारखान्यांनी एफआरपी काही टक्के भागवली आहे, त्यांना उर्वरीत थकबाकी भागवण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

बैठक़ीमध्ये शेतकर्‍यांनी एकरकमी एफआरपीची मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश साखर कारखाने, शेतकरी आणि शेतकरी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीनंतर जारी केला. त्यांनी सांगितले की, ऊसाच्या दराच्या मागणीबाबत जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होवू नये. यावेळी क्षेत्रीय साखर उपनिदेशक पांडुरंग साठें, निवासी डिप्टी जिल्हाधिकारी अजित देशमुख, डिप्टी जिल्हाधकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here