दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २६ जून २०२३ रोजी सांगलीत मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

पाटील म्हणाले, शेतकऱ्याला उसाला प्रती टन १५०० रुपये कमी मिळत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर मिळण्यासाठी सरकारने दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान मिळावे यासह विविध प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सोमवारी (२३ जून २०२३ ) रोजी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here