देशात आतापर्यंत ३५.२४ मिलिन टन साखर उत्पादन : NFCSFL

नवी दिल्ली : गेल्या वर्षी झालेला चांगला पाऊस आणि ऊसाचे क्षेत्र वाढल्याने देशात उच्चांकी साखर उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात यावेळी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकले आहे. आणि महाराष्ट्रातील काही साखर कारखाने १५ जूनपर्यंत सुरू राहतील अशी शक्यता आहे. ३० मेपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून ५.२४ मिलियन टन झाले आहे. तर एक वर्षापूर्वी समान कालावधीत साखर उत्पादन ३०.६३ मिलियन टन होते. आतापर्यंत झालेले साखर उत्पादन पूर्ण २०२०-२१ या हंगामात उत्पादित करण्यात आलेल्या ३१.१२ मिलियन टनापेक्षा खूप अधिक आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडकडील (NFCSFL) आकडेवारीनुसार, चालू हंगामाच्या अखेरपर्यंत ४-५ लाख टन साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसह अन्य सर्व राज्यांना मागे टाकले आहे. राज्यात ३० मेअखेर साखर उत्पादन १३.६८ मिलियन टन झाले आहे. तर एक वर्षापूर्वी समान कालावधीत हे उत्पादन १०.६३ मिलियन टन होते. उत्तर प्रदेशात यावर्षी साखर उत्पादन १०.२ कोटी टन झाले आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या ११.०१ मिलियन टनापेक्षा हे उत्पादन कमी आहे.

आकडेवारीनुसार दिसून येते की कर्नाटकमध्ये उत्पादन ४.२५ मिलियन टनापासून वाढून ५.९२ मिलियन टन झाले आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर या सणाच्या कालावधीत साखरेची पुरेशी उपलब्धता करण्यासाठी २०२१-२२ या हंगामात साखर निर्यात एक कोटी टनावर मर्यादीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here