एक नोव्हेंबरपासून सुरु होणार बिजनौर साखर कारखान्यामध्ये गाळप

बिजनौर: बिजनौर साखर कारखाना एक नोव्हेंबर पासून गाळप सुरु करणार आहे. कारखान्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गाळप पंधरा दिवस आधी सुरु होणार आहे. कारखान्याच्या खरेदी केंद्रांमध्ये एक किंवा दोन दिवसआधी खरेदी सुरु होईल.

बिजनौर साखर कारखान्याशी जवळपास 14 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. हे शेतकरी कारखान्याच्या गेटवर किंवा खरेदी केंद्रांवर ऊसाचा पुरवठा करतात. बिजनौर साखर कारखान्याच्या विक्री विरोदात सीबीआई तपासणी सुरु आहे. यासाठी कारखाना सुरु करण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या वर्षी डीएम यांना लिहिलेल्या पत्रात कारखाना प्रशासनाने सांगितले होते की, अनेक कारणांमुळे कारखाना सुरु होवू शकणार नाही. कारखान्याकडून ऊसाच्या मागणीवरुन सांगितले जाते की, कारखाना किती ऊस गाळप करण्याच्या स्थितीमध्ये आहे. गेल्या वर्षी कारखान्याचे परिचालन सर्वात उशिरा सुरु झाले होते. कारखान्याचे सर्व सात खरेदी केंद्र स्थापन केले जातील. कारखान्याच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. कारखान्याने ऊसाची मागणीही बर्‍याच दिवसांपूर्वी ऊस विभागाला पाठवली आहे. जीएम इसरार अहमद यांच्या नुसार, कारखान्यामध्ये दुरुस्ती केली जात आहे. खरेदी केंद्रांचे निर्धारण झाले आहे आणि बाकी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. कारखान्याचे संचलन वेळेत सुरु होईल. एक नोव्हेंबर पासून, गाळपाची तयारी केली जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here