साखर कारखान्याचे गाळप १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार

धामपूर : धामपूर साखर कारखान्याने २०२०-२१ या हंगामातील शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. शेतकऱ्यांना देण्यासाठी ७६४.३० कोटी रुपये संबंधित ऊस विकास समित्यांना दिल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष एम. आर. खान यांनी दिली.

तर कारखाना आगामी गळीत हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधीच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ऊस विभागाचे महा प्रबंधक ओमवीर सिंह यांनी दिली. गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी कारखाना सुरू करण्यात आला होता. यंदा १९ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होईल.

यामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या भरणी पासून इतर कामांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. साखर कारखाना गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा आधीच सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ऊस लवकर कारखान्याला पाठवून गव्हाचे पिक लवकर घेता येईल. गेल्या हंगामात धामपूर साखर कारखान्याने ऊस गाळपात देशात पहिला क्रमांक पटकावला होता. आगामी गाळप हंगामातही हा विक्रम अबाधित राखण्याचे प्रयत्न कारखान्याचे आहेत. यावेळी प्रशासन विभागाचे महा प्रबंधक विजय गुप्ता, वरिष्ठ ऊस व्यवस्थापक मनोज चौहान उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here