महाराष्ट्रातील गाळप हंगाम जवळपास समाप्त, एकच कारखाना सुरु

कोल्हापूर : कोरोना संकटामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला असूनही साखर कारखाने या संकटाशी दोन हात करुन गाळप कार्य करत आहेत. कोरोनामुळे कारखान्यांची गती मंदावली होती, पण कारखान्यांनी कारोनोशी सामना करत आपले गाळप सुरु ठेवले आहे.

महाराष्ट्रामध्ये केवळ एक साखर कारखाना सोडून इतर सार्‍या कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) च्या नुसार, महाराष्ट्रात 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झाले होते, तर गेल्या वर्षाच्या 2018-19 च्या हंगामात उत्पादीत 107.15 लाख टनाच्या तुलनेमध्ये जवळपास 46.3 लाख टन इतकी कमी आहे. सध्याच्या गाळप हंगामामध्ये, 145 कारखान्यांनी पूर्वीच आपले गाळप बंद केले आहे आणि केवळ 1 साखर कारखाना सुरु आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 लाच संपला होता.

या हंगामात एकूण 146 साखर कारखान्यांनी ऊस  गाळपात भाग घेतला होंता. या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना दुष्काळ आणि महापूराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे साखर उत्पादन कमी झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here