अवध साखर कारखान्याच्या गाळप हंगामाआधी कारखान्यामध्ये पूजन

स्योहारा, उत्तर प्रदेश: अवध साखर कारखान्याच्या गाळप हंगामासाठी कारखान्यामध्ये पूजन करण्यात आले. गवाणीमध्ये ऊस घालण्यात आला. अवध साखर कारखान्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. पूजन पंडित राकेश शर्मा व मुकेश द्वीवेदी, कार्यकारी उपाध्यक्ष फायनॅन्स आशुतोष त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यकारी अध्यक्ष सुखबीर सिंह यांनी छोट्या चेन चे पूजन केले. यानंतर बिरला फार्म कुरी केसोपूर चे शेतकरी हरपाल सिंह आणि भोले यांच्या ऊसाची गाडी वजन काट्यावर उभी करुन बैलांचे पूजन केले. कार्यकारी ऊस अध्यक्ष बलवंत सिंह यांनी बैलांना प्रसाद दिला. त्यांना कुंकु लावले. यावेळी बैलांना झूल देखील देण्यात आले. शेतकरी हरपाल सिंह आणि भोले यांना बक्षीस देण्यात आले.

साखर कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष सुखबीर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा, शुभारंभ 29 ऑक्टोबर ला केला जाईल. शेतकर्‍यांना ऊसाचे इंडेंट पाठवण्याची तयारी केली जात आहे. त्यांनी सांगितले की, थकबाकी भागवण्याबाबत त्यांचा साखर कारखाना अग्रणी आहे. उपाध्यक्ष राजीव त्यागी, चीफ इंजिनिअर धमेंद्र सिंह, बिडला फार्म अफजलगढ चे प्रभारी व्यवस्थापक महेंद्र मान शेखावत, मनोज गोयल, विवेक कांत शर्मा, प्रवीण अग्रवाल, नीरज गुप्ता, डॉ गिरीश श्रीवास्तव, ओम प्रकाश, मैनेजर एचआर विवेक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here