दिवाळीनंतर सुरु होणार लक्सर साखर कारखान्याचा गाळप हंगाम

देहरादून: लक्सर साखर कारखाना दिवाळीनंतर गाळप हंगाम सुरु करतील. कारखान्याने लक्सर उस समितीला पत्र पाठवून सर्व तयारी झाल्याचे सांगितले आहे. कारखान्याने आपल्या सर्व क्रय केंद्रांवर उस खरेदीची तयारी पूर्ण केली आहे.

लक्सर उस विकास समितीशी संबंधीत जवळपास 45 हजार शेतकरी लक्सर साखर कारखान्यामध्ये उसाचा पुरवठा करत आहेत. आतापर्यंत साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु न झाल्याने शेतकरी गुर्‍हाळांमध्ये उस घालत होते. शेतकरी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होण्याची वाट पाहात आहेत. लक्सर साखर कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी सांगितले की, दिवाळींनतर लगेचच कारखान्यात गाळप हंगाम सुरु केला जाईल. याबाबत उस विकास समितीचे विशेष सचिव गौतम सिंह नेगी यांना पत्र पाठवण्यात आले आहे. साखर कारखान्याचे उस महाव्यवस्थापक पवन ढींगरा यांनी सांगितले की, त्यांनी उस क्रय केंद्रांवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here