साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

बुलंदशहर : जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. हंगाम गतीने सुरू असून तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चार साखर कारखान्यांनी १५७.७५ लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळप झाले आहे. गेल्यावर्षी यापेक्षा कमी गाळप झाले होते. यंदा पहासूची साबितगड म्हणजे त्रिवेणी साखर कारखान्याने सर्वधिक ६७.९७ लाख क्विंटल गाळप केले आहे. अद्याप सर्व साखर कारखान्यांकडे ऊस उपलब्ध आहे. लावणीच्या उसाचे गाळप संपुष्टात आले असून आता खोडवा उसाची तोडणी सुरू असल्याचे ऊस विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखाना आता हळूहळू गळीत हंगामाच्या अखेरच्या सत्राकडे चालला आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या सुरुवातीला कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल. साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामातील ऊस बिले गतीने दिली आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, साबितगड साखर कारखान्याने २०८ कोटी, अगौताच्या अनामिका साखर कारखान्याने ९३ कोटी रुपये, वेव साखर कारखान्याने ४५ कोटी रुपये, अनुपशहर सहकारी साखर कारखान्याने २८ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. ऊस बिले देण्यात विभागात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी म्हणाले की, आतापर्यंत १५७.७५ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. गाळप मे महिन्यातही सुरू राहील अशी स्थिती आहे. कारखान्यांना भरपूर ऊस उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here