टिकोला साखर कारखान्याचा गाळप हंगाम 29 ऑक्टोबर पासून सुरु होणार

मेरठ, उत्तर प्रदेश: मेरठ येथील मवाना मध्ये टिकोला साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा शुभारंभ 29 ऑक्टोबर पासून सुरु होईल. कारखान्याकडून पाच दिवसापूर्वी 27 हजार क्विंटल ऊसाचा हेतू जाहीर करण्यात आला आहे. तर गेट व सेंटर ची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मवाना समितीशी 41 गावातील हजारो शेतकरी जोडलेले आहेत.

विभागामध्ये गाळप हंगाम 2020-21 सुरु होणार आहे तर, मंडलमध्ये एकानंतर एक साखर कारखान्याची धुराडे पेटण्यास सुरुवात होईल. टिकोला स्थित साखर कारखान्याचा गाळप हंगाम 29 ऑक्टोबरपासून सुरु होईल, जो गेल्या वर्षी एक नोंव्हेंबरला सुरु झाला होता, यंदा तीन दिवस आधी 29 ऑक्टोबरला सुरु होत आहे. यासाठी 27 हजार क्विंटल मागणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

खरेदी केंद्रांवर 27 ऑक्टोबर पासून वजन करणे सुरु होईल. नियमानुसार पाच दिवसा पूर्वी गावामध्ये पावती मागणी जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता 90 हजार क्विंटल आहे पण सध्या 27 हजार क्विंटल ची मागणी जाहीर केली आहे.

कारखान्याचे महाव्यवस्थापक साइन अंसार यांनी सांगितले की, 29 ऑक्टोबरला गाळप हंगाम विधिवत सुरु होईल. सध्या 27 हजार क्विंटल ची मागणी जाहीर करण्यात आली आहे. आठवड्याभरामध्ये कारखाना पूर्ण क्षमतेसह 90 हजार क्विंटल ऊसाचे गाळप सुरु करेल . ज्यामध्ये 48 हजार क्विंटल गेट आणि 52 हजार क्विंटल ऊस सेंटरचा येतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here