करनाल साखर कारखान्यामध्ये 10 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु

करनाल: उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सांगितले की, द करनाल सहकारी साखर कारखाना लिमिटेड च्या नव्या गाळप हंगामाची सुरुवात 10 नोव्हेंबर ला केली जाईल. त्यांनी समितीच्या सदस्यांना अपील केले की, त्यांनी कारखान्यामध्ये जास्तीत जास्त उस आणण्यासाठी शेतकर्‍यांना जागरुक करावे.

उपायुक्त मंगळवारी साखर कारखान्याची बोर्ड कमेटी च्या बैठकीला संबोधित करत होते. बैठकीमद्ये सर्वसंमतीने अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी शेतकरी विकास केंद्र उघडले जाईल. या केंद्रामध्ये शेतकर्‍यांना खत, बि बियाणे उपलब्ध करवले जाईल. बैठकीमध्ये एमडी साखर कारखाना अदिती यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी कारखान्याकडून अनेक प्रकारची सुविधा दिली जात आहेत. कारखाना घाट्यातून उभा राहावा यासाठी कारखान्याकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. करनाल कारखाना उत्पादनाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथम येत आहे. यावेळी करनाल साखर कारखाना पहिला राहिल, यासाठी त्यांनी आश्‍वासन दिले आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here