बदायूं च्या शेखूपुर साखर कारखान्यामध्ये 18 नोव्हेंबर पासून सुरु होणार गाळप हंगाम

बदायूं: द सहकारी साखर कारखाना शेखूपुर ची क्षमता वाढू शकली नाही, पण आता 18 नोव्हेंबर पासून साखर कारखान्यामध्ये नवा गाळप हंगाम सुरु केला जाईल. साखर कारखाना प्रशासनाने यावेळी जास्त उस गाळपाचे लक्ष्य ठेेवले आहे. 17 नोव्हेंबर ला साखर कारखान्यामध्ये पूजेचे आयोजन केले जाईल.

साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक राजीव रस्तोगी यांनी सांगितले की, वर्ष 2019-20 मध्ये 13.97 लाख टन उसाचे गाळप झाले होते. यावर्षी 15 लाख टन उसाच्या गाळपाचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. गेल्या वर्षी रिकवरी दर 8.88 टक्के होता. यावर्षी रिकवरी दराचे लक्ष्य 9 टक्के ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस च्या माध्यमातून पावत्या पाठवल्या जातील. शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येवू नये यासाठी पूर्ण व्यवस्था केली जात आहे. त्यांनी सांगितले की, साख़र कारखान्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार प्रशांत साखर कारखान्यामध्ये पूजन करुन नव्या गाळप हंगामाचा शुभारंभ करतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here