साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला

शामली: शनिवारी रात्री शामली साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला. शामली  कारखान्याचा गाळप हंगाम थोडा अडचणीचा झाला होता. कारखान्याने एकत्रच इंडेंट अधिक दिल्याने शेतकरी कारखान्यावर ऊस घेऊन पोचले होते. कारखाना बंद होऊन आपल्या शेतातील ऊस शेतातच राहतो की काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत होती. शनिवारी रात्री जवळपास १२ वाजता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला. ४६.६८ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यांनी सांगितले की, जनपद येथील तीन साखर कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊसाचा पुन्हा सर्वे केला आणि गाळप योग्य ऊसाच्या पावत्या देऊन तो ऊस खरेदी करण्यात आला. जनपद येथील शामली, ऊन आणि थाना भवन या तिनही कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. शामली कारखान्याने १३ जून, ऊन कारखान्याने २० मे आणि थानाभवन ने ३० मे ला गाळप हंगाम पूर्ण केला आहे. ते म्हणाले की, गेल्या गाळप हंगामाच्या सापेक्ष यंदा जनपद येथील तीनही कारखान्यांमध्ये ४६.६८ लाख क्विंटल अर्थात  १४.०८ टक्के अधिक ऊस गाळप करण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here