हसनपूर साखर कारखान्यात १४ डिसेंबरपासून होणार गाळप

हसनपूर : हसनपूर साखर कारखान्यामध्ये नव्या गळीत हंगामात १४ डिसेंबरपासून उसाचे गाळप सुरू होणार आहे. कारखाना प्रशासनाने याची तयारी सुरू केली आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये ६३ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

१४ डिसेंबर रोजी एसडीओ रोसडा साखर कारखान्यात गळी हंगामाचे उद्घाटन करतील. साडेअकरा वाजता संचालक आर. के. तिवारी यांच्यासह संचालक मंडळ पूजा-अर्जा करतील. एक वाजता गळीत हंगामाचे उद्घाटन होईल. कारखान्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांच्या ऊस तोडणीचे चलन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. वरिष्ठ ऊस उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय यांनी पहिल्या दिवशी २५ हजार क्विंटल, दुसऱ्या दिवशी ३५ हजार क्विंटल, तिसऱ्या दिवशी ५० हजार, चौथ्या दिवशी ६० हजार आणि पाचव्या दिवशी ६५ हजार क्विटंल उसाचे गाळप करण्यात येणार आहे. तीन दिवसांचे चलन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. ऊस तोडणी गतीने झाल्याने शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी वेळेवर करता येईल. शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राने ऊस तोडणी करावी असे आवाहन केले आहे. यासाठी १८ ऊस तोंडणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. समस्तीपूर आणि बेगुसराय विभागातील गावात ही केंद्रे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here