साखर कारखाना सुरू ठेवणार, थकीत बिलेही देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

कुशीनगर : कुशीनगरमध्ये दिवंगत शेतकरी नेते बाबू गेंदा सिंह यांच्या जयंतीदिनी होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. माजी मंत्री राधेश्याम सिंह यांनी कप्तानगंज साखर कारखाना चालवणे आणि शेतकऱ्यांच्या थकीत ४२ कोटी रुपयांच्या ऊस बिलांपोटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा केली होती. जिल्हाधिकारी रमेश रंजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कुशीनगर जिल्हा हा साखरेचे भांडार म्हणून ओळखला जात होता. येथील कारखाना बंद राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने तो पुन्हा सुरू व्हावा यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कप्तानगंजमधील कनोडिया साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ४२ कोटी रुपये थकीत आहेत. याबाबत सपाचे नेते, माजी मंत्री राधेश्याम यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ते स्थगित करण्यात आले. साखर कारखाना सुरू ठेवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. दरम्यान, पंजाब सरकारने ऊस दर ३८० रुपये निश्चित केला आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने अद्याप दराची घोषणा केलेली नाही. योगी सरकारने राज्यात ४०० रुपये ऊस दर देऊन साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here