शेतकरी नेत्यांच्या मागणीवरुन कारखान्याने भागवली थकबाकी

रुडकी : लक्सर ऊस समिती अध्यक्षांबराबेर एका प्रतिनिधी मंडळाने लक्सर साखर कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक यांची भेट घेवून शेतकर्‍यांच्या ऊस थकबाकीची मागणी केली. या मागणीवर मुख्य व्यवस्थापकांनी सहमती दाखवून 16 ते 31 मार्च पर्यंतची साडे पस्तीस करोड ची थकबाकी भागवण्याचे जाहीर केले आहे.

शुक्रवारी लक्सर सहकारी ऊस विकास समितीचे अध्यक्ष चौधऱी जितेंद्र नागर आणि जिल्हा पंजायत सदस्य बिजेंद्र सिंह यांच्या सह माजी समिती अध्यक्ष चौधऱी आजाद सिंह आणि सौऱभ नागर यांनी साखर कारखान्यात जावून कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांची भेट घेतली. त्यांनी व्यवस्थापकांना सांगितले की, शेतकर्‍यांची थकबाकी सणांपुर्वी भागवली जाणे आवश्यक होते. पण पैसा न मिळाल्याने शेतकरी सणही साजरे करु शकत नाहीत. ऊसाची लागवड आणि देखभालीसाठी शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. हे लक्षात घेवून त्यांनी शेतकर्‍यांना तात्काळ थकबाकी द्यावी अशी मागणी केली. समिती अध्यक्षांनी सांगितले की, मुख्य व्यवस्थापकांनी त्यांच्या मागणीवर सहमती दाखवून 16 ते 31 मार्च पर्यंतच्या थकबाकीचे एकूण 35 करोड 66 लाख रुपये लक्सर शिवाय ज्वालापुर, इकबालपूर समित्यांना जारी केले आहेत. सांगितले आहे की, सोमवारपर्यंत ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक अकांउट मध्ये पाठवण्याचे निर्देश समिती सचिव यांना देण्यात आले आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here