शेतकर्‍यांनी साखर कारखान्यांकडे केली ऊस थकबाकीची मागणी

झबरेडा: राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या वतीने रविवारी इकबालपूर मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकर्‍यांनी इकबालपूर साखर कारखाना व्यवस्थापनावर मनमानी कारभार करण्याचा आरोप केला. तसेच कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्‍यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पद्मसिंह भाटी म्हणाले, इकबालपूर साखर कारखान्याने शेतकर्‍यांना धोका दिला आहे. सध्याच्या गाळप हंगामात कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे वेळेत दिलेले नाहीत. आतापर्यंत शेतकर्‍यांना 22 फेब्रुवारी पर्यंतचेच पैसे मिळाले आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षांची थकबाकी आतापर्यंत दिलेली नाही. यामुळे शेतकर्‍यांच्यात मोठा असंतोष आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून जुन्या थकबाकीचे केवळ 15 करोड रुपयेच दिले गेले आहेत. तर शेतकर्‍यांचे 209 करोड रुपयें बाकी आहेत. जर कारखाना व्यवस्थापनाने लवकरात लवकर ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवली नाही तर शेतकरी मोठे आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश महासचिव डॉ. अनिल चौधरी, युद्धवीर सिंह, जिल्हाध्यक्ष पहल सिंह पवार, प्रदेश उपाध्यक्ष अजय वर्मा, महक सिंह, सतीश चौधरी, मोहम्मद अखलाक, इकराम, मोनू त्यागी आदी उपस्थित होते

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here