आगीत तीन एकरमधील ऊस भस्मसात

गढपुरा : मालीपूर ठाण्याच्या हद्दीतील मुसेपूर गारा चौर येथे सोमवारी सायंकाळी शेताला लागलेल्या भीषण आगीत सुमारे तीन एकरातील ऊस जळून खाक झाला. रानीचक येथील शेतकरी भोला साहू यांचे सर्वाधिक नुकसान झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

साहू यांच्या शेतातील सर्व पिक जळाले. याशइवाय मुसेपूर येथील रंजय राय यांचे पंधरा गुंठे, रानीचक येथील अनिल महतो यांचा १० गुंठे ऊस आगीत भस्मसात झाला. याबाबतची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर ऊस जळाला.

शेतकरी भोला साहू यांनी सांगितले की शेजारील राम देव महतो यांच्याकडून शेतात पाला जाळला जात होता. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. गेल्यावर्षी महापुरामुळे उसाचे पिक पाण्यात बुडाले होते. त्यामुळे साखर कारखान्याला वेळेवर पाठवता आला नाही. आता पाण्याअभावी ऊस वाळत असताना शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ऊस जळाल्याने तो घेण्यास क्रशरही तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या आगीत एकूण दोन लाख रुपयांच्या ऊसाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here