उत्तर प्रदेश: आग लागून ऊसाचे पीक जळाले

शाकंभरी, उत्तर प्रदेश: गेल्या रात्री रजापुर नौगावा गावामध्ये आग लागून अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक जळाले. रजापुर नौगावातून बाहेरच्या बाजूला शेतकऱ्यांची शेते आहेत. ज्यामध्ये ऊसाच्या पिकाला आग लागली. रविवारच्या रात्री जवळपास दहा वाजता अचानक पिकातून आगीचे लोट येऊ लागले. सूचना मिळाल्यावर शेतकरी शेतात आले.

नागरीकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत मुकेश चौहान यांची सहा एकर, सुधीर चौहान यांची चार एकर, गिरवर चौहान यांची दोन एकर, अनिल चौहान यांची दोन एकर ऊसाची शेती जळून खराब झाली होती. पीडित शेतकऱ्यांनुसार त्यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here