गुवाहाटी : आसाममधील पुरामुळे सोमवारी परिस्थिती आणखी बिकट झाली. आतापर्यंत अकरा लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील ३४ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४८ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.
मदत आणि बचाव कार्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलासह राष्ट्रीय आणि राज्य एजन्सी चोवीस तास काम करत असल्याने, आसाम सरकारने बाधित लोकांपर्यंत पोहचत आहे. मदतीसाठी सैन्याला सज्ज राहण्यास सांगितले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आठ जिल्ह्यांमध्ये ताज्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर पाच जिल्ह्यांमध्ये सात लोक बेपत्ता आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षी एप्रिलपासून मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसामुळे लहान मुले आणि महिलांसह ६४ लोकांचा मृत्यू झाला, तर भूस्खलनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री ASDMAच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की १०,४३,३८२ मुलांसह ४७,७२,१३० लोकांना पुराचा फटका बसला आहे.