विधानसभेत गाजला १६ वर्षांपासून बंद पडलेल्या साखर कारखान्याचा मुद्दा

जास : शेरो येथील साखर कारखाना २००६ मध्ये आर्थिक अडचणींमुळे बंद करण्यात आला होता. हा कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आधी २०१७ आणि नंतर २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी मुद्दा बनवला. आता सोळा वर्षानंतर कारखाना सुरू करण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. खेमकरणचे आमदार सरवण सिंह धुन्न यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की, राज्य सरकारने हा कारखाना पुन्हा सुरू करावा यासाठी जिल्हा तरनतारन आणि अमृतसरशी संबंधीत आठ आमदारांचे एकमत आहे. आमदार सरवण सिंह धुन्न यांनी तरनतारन विभागात पाणी पातळी ८०० फुटांपर्यंत खावालल्याचे सांगितले. घटत्या भुजलाचा स्तर हा चिंतेचा विषय आहे असे ते म्हणणाले. जर साखर कारखाना सुरू झाला तर पिक फेरपालटासाठी ते शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते असा दावा त्यांनी केला.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि राज्याचे तत्काळीन अर्थ सचिव डॉ. मनोहर सिंह गिल यांनी १० नोव्हेंबर १९८७ रोजी या कारखान्याचे उद्घाटन केले होते. ११० एकर क्षेत्रात पसरलेल्या कारखान्यात ५०० कर्मचारी काम करीत होते. जेव्हा २००५ मध्ये कारखाना बंद झाला, तेव्हा २५ कोटी रुपयांचा तोटा होता. २००६ मध्ये कारखाना बंद झाल्यानंतर पाच वर्षांनी कामगारांना सरकारी लाभ देवून घरी पाठवण्यात आले. २०१५ मध्ये शिअद-भाजप आघाडीने येथे फूड प्रोसेसिंग युनिटला मंजुरी दिली. मात्र, हे आश्वासन हवेतच विरले. त्यानंतर वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. २०१७ मध्ये काँग्रेस सरकारकडे कारखाना सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार काश्मीर सिंह सोहल यांनी एप्रिल महिन्यात सहकार मंत्री हरपाल सिंह चीमा यांच्यासमोर कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here