नानौता: किसान सहकारी कारखाना आपल्या पूर्ण क्षमतेनुसार ऊस उपलब्ध नसल्याने संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कारखाना नऊ मे रोजी बंद केला जाणार आहे. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. प्रशांत कुमार यांनी सांगितले की,
गेल्या काही दिवसापासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. मात्र गेटवर उसाची खरेदी सुरू आहे.
आता शेतकऱ्यांनी आपल्या उसाचा पुरवठा नऊ मेरोजी दुपारी चार वाजेपर्यंत करावा. गाळप करण्यायोग्य ऊस स्वीकारला जाईल असे डॉ. प्रशांत कुमार यांनी सांगितले. त्यानंतर उसाअभावी कारखाना २०२०-२१ या हंगामासाठी बंद केला जाईल. त्यानंतर उर्वरीत उसासाठी कारखाना जबाबदार राहणार नाही