मवाना कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू करणार

मवाना : राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी २५ ऑक्टोबरपासून नवा गाळप हंगाम सुरू करावा असे निर्देश सरकारने दिला आहे. त्यामुळे ऊस आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे सर्व साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी उसाची रिकव्हरी या काळात कमी असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगाम सुरू करण्याबाबत भूमिका ठेवली आहे. मवाना कारखान्याने गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, कारखाना प्रशासनाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू करण्याची अपेक्षा आहे.

मवाना साखर कारखान्यासह सर्व साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन उसाची पाहणी सुरू केली आहे. या काळात उसाचा उतारा चांगला मिळेल का याची पडताळणी सुरू आहे. उसाची रिकव्हरी सात टक्क्यांच्या आसपास मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही रिकव्हरी पुढील २० दिवसांत आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर पाऊस पडला नाही तर रिकव्हरी चांगली वाढेल. रिकव्हरी नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर गाळप सुरू करण्याची अपेक्षा कारखान्यांची आहे.

कारखान्याचे ऊस विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक विरेंद्र कुमार यांनी सांगितले की, उसाच्या गाळपाची तयारी सुरू आहे. प्लांट गाळपासाठी सज्ज आहे. मवाना कारखान्याची १५६ पैकी ७० ऊस खरेदी केंद्रे स्थापन झाली आहेत. उर्वरित या महिनाअखेरीस सुरू होतील. कारखान्याचे गाळप गेल्यावर्षी चार नोव्हेंबर रोजी सुरू झाले होते. मवाना खुर्द, पिलौना, निलोहा, बढला, इकवारा, बस्तोरा, धनपूर, कौल, इंचोली ही ऊस खरेदी केंद्रे सरू आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here