प्लांटच्या सफाईसाठी 40 तास बंद राहिल साखर कारखान्यातील गाळप

कायमगंज: साखर कारखान्याच्या बॉयलर चे प्रेशर डाउन झाल्याने गाळप सतत बंद होत आहे. गाळप सलग होण्यासाठी कारखाना प्रशासनाने प्लांटची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना प्रशासनाने 40 तासासाठी प्लांट बंद करण्याची नोटीस जारी करुन शेतकर्‍यांना सूचना दिली आहे.

या हंगामात साखर कारखाना सुरु झाल्यानंतर पासून आतापर्यंत प्लांटची सफाई झाली नाही. यामुळे बॉयलर चें प्रेशर सतत डाउन होत होते. जवळपास एक आठवड्यापासून गाळप कार्य थांबून थांबून सुरु आहे. पाच दिवसांपूर्वी कारखाना प्रशासनाने सुक्या इंधनाचीही व्यवस्था केली, पण गाळप योग्यपणे सुरु होवू शकले नाही. सतत गाळप ठप्प होण्यामुळे शेतकर्‍यांना अनेक दिवसांपर्यंत यार्डमध्ये राहून वेळ काढावा लागत होता. रविवारी दुपारी जेव्हा प्लांट बंद झाला तेव्हा शेतकरी हतबल झाले. 22-24 शेतकरी जीएम यांच्याकडे उत्तर मागण्यासाठी हाउस मध्ये घुसले. तिथे सीसीओ यांनी शेतकर्‍यांना समजावून बाहेर केले होते. सोमवारी कारखाना प्रशासनाने उच्चाधिकार्‍यांना सूचना पाठवली की, 31 डिसेंबर पासून 40 तासांसाठी प्लांटमध्ये या हंगामाचे प्रथम स्वच्छता काम केले जाईल. दरम्यान गाळप बंद राहणार. तसेच शेतकर्‍यांना उस पुरवठ्यासाठी पाठवण्यात येणारे मेसेज आणि पावत्याही थांबवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here