ऊस थकबाकी आणि नोकरीबाबत आमदारांनी घातला कारखान्याला घेराव

बिजुआ, उत्तर प्रदेश: शेतकर्‍यांची ऊस थकबाकी भागवणे तसेच क्षेत्रातील युवकांना नोकरी देण्याच्या मागणीबाबत गोला आमदार अरविंद गिरी यांनी गुलरिया साखर कारखान्याला घेराव घातला. शेतकरी, युवकांच्या बरोबर आमदारांनी कारखान्यामध्ये धरणे आंदोलन केले. यापूर्वी गिरी यांनी कुंभी साखर कारखान्यामध्येही या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले आहे.

गोला आमदार अरविंद गिरी कारखान्यांमध्ये स्थानिक युवकांना नोकरी मिळावी हा मुद्दा मांडत आहेत. त्यांची मागणी आहे की, खाजगी कंपन्यांनी 40 टक्के पदांवर स्थानिक युवकांना भर्ती करावे. यासाठी त्यांनी एक पत्रही कारखान्याला लिहिले होते. आमदारांनी सांगितले की, फैक्ट्री टाकल्याने लोकांमध्ये आनंद होता, कारण आता क्षेत्रातील तरुणांना रोजगार मिळेल पण कारखान्याने तो आनंद मातीत मिळाला. शिवाय बाहेरच्या लोकांना नोकरी देवून स्थानिक लोकांना धोका दिला आहे. कारखान्याकडून जीएम केन यांनी याचा खुलासा करताना सांगितले की, शेतकरी आणि कारखान्याची साथ वर्षानुवर्षांची आहे.

ऊस जर रोगग्रस्त आहे तर शेतकर्‍यांना पीक चक्र स्विकारावे लागेल. ऊस रोगग्रस्त होणार नाही. थकबाकी मिळणे हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे, 90 टक्के बाकी भागवण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत ऊस थकबाकी भागवण्याची शक्यता आहे. दरम्यान संतापलेल्या शेतकर्‍यांनी ऊस थकबाकी भागवण्याबरोबरच नोकरी मिळण्याच्या आमदारांच्या मागणीचे समर्थन केले. यावेळी मंडल महामंत्री धीरेंद्र सिंह, विजय सिंह, मुकेश कुमार, उत्कर्ष दीक्षित, शेषदत्त वाजपेयी, सुधीर अवस्थी यांच्याशिवाय कारखान्याचे जीएम ओपी चौहान, लखन लाल, अन्नू मिश्रा तसेच चौकी इंचार्ज विपिन कुमार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here