शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यसाठी आमदारांनी घेतली व्यवस्थापकांची भेट

बागपत: छपरौली आमदार सहेंद्र सिंह यांनी मंगळवारी शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत सहकारी साखर कारखाना रमाला चे प्रमुख व्यवस्थापक यांची भेट घेतली आणि आगामी गाळप हंगाम नियीमत पणे सुरु केला जाण्यावर भर दिला. दरम्यान आमदार यांनी कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक आरबी राम यांच्या समोर शेतकर्‍यांचा नवा बॉन्ड बनवणे, ऊस सर्वे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वजन कपातीवर लगाम घालणे, शेतकरी भवन दुरुस्त करणे आदी समस्या मांडल्या. ते म्हणाले, गाळप हंगाम वेळेत सुरु व्हावा, ज्यामुळे गव्हाची लागवड वेळेत होवू शकेल. ते म्हणाले की, ओवरलोड ऊस वाहनांवर प्रतिबंध घातला जावा, कारण या वाहनांमुळे दुर्घटना आणि रस्ते खराब होण्याचा धोका आहे. टरबाइन, बॉयलर, पंप आदी योग्य असावेत. गेल्या गाळप हंगामाप्रमाणे शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येवू नये. मुख्य व्यवस्थापक यांनी सांगितले की,गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरु केला जाईल.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here