15 डिसेंबर पर्यंत साखर कारखान्याने थकबाकी भागवावी

शामली: डीएम जसजीत कौर यांनी समीक्षा करुन सांगितले की, सर्व साखर कारखान्यांनी 15 डिसेंबर पर्यंत गेल्या वर्षीची उस थकबाकी अवश्य भागवावी. पैसे न भागवणार्‍या साखर कारखानदारांविरोधात कारवाई केली जाईल.

शनिवारी कलक्ट्रेट डीएम कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या साखर कारखान्यांच्या व्यवस्थपकांच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर गेल्या 2019-20 च्या हंगामातील 323 करोड 61 लाख रुपये देय आहे. डीएम यांनी गेल्या हंगामातील थकबाकी भागवण्यात केलेल्या विलंबाबाबत साखर कारखान्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी गेल्या हंगामातील थकबाकी जानेंवारी 2021 पर्यंत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी सर्व साखर कारखान्यांनी 15 डिसेंबर पर्यंत सर्व थकबाकी भागवावी असे निर्देश दिले आहेत. 15 डिसेंबर पर्यंत थकबाकी न भागवल्यास कारखानदार, व्यवस्थपकांविरोधात कारवाई केली जाईल. बैठक़ीमध्ये शामली साखर कारखान्याचे चीफ ऑपरेटिंग अधिकारी आरबी खोखर, उस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया, थानाभवन साखर कारखान्याचे यूनिट हेड वीर पाल सिंह, उस महाव्यवस्थापक जेबी तोमर, उन साखर कारखाना उस महाव्यवस्थापक अनिल कुमार अहलावत, अकाउंट हेड विक्रम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here