ऊस तोडणी पूर्ण होईपर्यंत साखर कारखान्यात गाळप सुरु राहील: मंत्री

मुजफ्फरनगर(उत्तरप्रदेश): कोरोना वायरसचा परिणाम साखर कारखान्यांवरही झाला आहे. यानंतर साखर कारखान्यांच्या गाळपावरही याचा परिणाम दिसत आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी जिल्ह्यात साखर कारखान्यांना ऊस तोडणी पूर्ण होईपर्यंत चालू गाळप हंगाम सुरु ठेवण्यासाठी सांगितले आहे. मंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकार्‍यांच्या सोबत आठ साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांबरोबर बैठक घेतली.

मंत्री म्हणाले, लॉकडाउन दरम्यान, जिल्ह्यातील आठ साखर कारखाने चांगल्या पद्धतीने सुरु आहेत. आणि जोपर्यं ऊस तोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गाळप सुरु राहील. या दरम्यान, जिल्हा ऊस अधिक़ारी आर.डी. दिवेदी यांनी सांगितले की, आठ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करत आहेत आणि त्यांनी 760 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. ते म्हणाले की, गेल्या गाळप हंगामात कारखान्यांनी 914 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here