साखर कारखाने जानेवारीपर्यंतची थकबाकी ऑगस्टमध्ये भागवणार

शामली : ऊस थकबाकी बाबात आयोजित करण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या अधिकार्‍याच्या बैठकीत जानेवारीपयंंतची ऊस थकबाकी ऑगस्टमध्ये भागवण्याबाबत सांगण्यात आले आहे. डीएम यांनी निश्‍चित केलेल्या तारखेपर्यंत थकबाकी भागवली नाही तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील तीनही साखर कारखान्यांकडून जवळपास 758.45 करोड रुपये देय आहेत.

जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये साखर कारखाना शामली च्या प्रतिनिधी ने सांगितले की, गाळप हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याने 120.14 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले, ज्याची 388.54 करोड इतकी थकबाकी बाकी आहे.यातील 147.91 करोड रुपयांची थकबाकी भागवली आहे. कारखान्याने एकूण देयापैकी 38.07 टक्के तथा 17 जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवले आहे. उन कारखान्याने 105.06 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते, ज्याचे 337.22 करोड देय बाकी आहे, पण यापैकी 138.65 करोड म्हणजेच 41.12 टक्के पैसे भागवण्यात आले आहेत. कारखान्याने 15 जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवले आहेत. थानाभवन कारखान्याने 152.92 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले, ज्याचे एकूण 490.82 करोड रुपये देय आहेत. त्यापैकी 171.57 करोड रुपये दिलेले आहेत, जे 34.96 टक्के आहे. कारखान्याने दहा जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे दिलेले आहेत. यावर डीएम यांनी नाराजी व्यक्त केली. शामली साखर कारखान्याने पाच ऑगस्टपर्यंत, कारखान्याने 31 जुलैपर्यंत, थानाभवन कारखान्याने 15 ऑगस्टपर्यंत जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे देण्याचे आश्‍वासन दिले आहे. बैठक़ीमध्ये डीसीओ विजय बहादुर सिंह, शामली कारखान्याचे जीएम डॉ. कुलदीप पिलानिया, अकांउंटंट हेड विजित जैन, ऊस कारखान्याचे जीएम के अनिल कुमार अहलावत, अकांउंटंट हेड विक्रम, थानाभवन कारखान्याकडून यूनिट हेड वीरपाल सिहं, जीएम केन जेबी तोमर तसेच अकाउंटंट हेड सुभाष बहुगुणा आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here