महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे: महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, १४ एप्रिल २०२१ अखेर १२२ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२१ अखेर १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात ९९१.२७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०२८.६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३५ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेड विभागातील १६ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण झाले आहे. अहमदनगरमध्ये ७ कारखाने बंद झाले असून औरंगाबादमध्ये ४ साखर कारखाने आणि अमरावतीमध्ये २ कारखाने बंद झाले आहेत. नागपूरमध्ये एका कारखान्याचा हंगाम संपला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here