जिल्ह्यातील सरासरी साखर रिकवरी मध्ये झाली घट

सहारनपूर: सध्याच्या हंगामामध्ये जिथे जिल्ह्यातील उस उत्पादकतेमध्ये घट झाली आहे, तिथे साखर कारखान्यांच्या सरासरी साखर रिकवरीवर ही विपरीत परिणाम झाला आहे. 20 नोव्सेंबरच्या आकड्यांनुसार गेल्या वर्षीची आपेक्षा यावेळी सरासरी साखर रिकवरी 0.74 टक्के कमी आहे.

हवामान आणि आजाराचा परिणाम उस उत्पादकतेसह कारखान्यांच्या साखर रिकवरीवर दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांच्या 20 नांव्हेंबर च्या आकड्यांनुसार या हंगामात सरासरी साखर रिकवरी सर्वात कमी आहे. गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर ला सरासरी साखर रिकवरी जिथे 9.61 टक्के होते तर यावेळी 20 नोंव्हेंबर ला 8.87 टक्के आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी साखर रिकवरीमध्ये 0.74 टक्के कमी आहे. कृषी वैज्ञानिक, शेतकरी आणि उस अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, कमी साखर रिकवरीचे कारण जानेवारी ते मार्चपर्यंत पडलेला पाअस, पोक्का बोईंग, रेड रॉट सारख्या रोगाचा प्रकोप आहे. 20 नोव्हेंंबरच्या आकड्यांनुसार यावेळी गेल्या वर्षाच्या अपेक्षेपेक्षा यावेळी साखर रिकवरी 0.74 टक्के कमी आहे. पण आता पूर्ण हंगामाच्या साखर रिकरवरीबाबत बोलणे योग्य नाही. कारण आता साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु होवून काहीच दिवस झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here