ऊस थकबाकीसाठी केले जाणार आंदोलन

बागपत : बुधवारी दोघट मध्ये भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता चौधरी राकेश टिकैत यांनी सांगितले की, ऊस थकबाकी व्याजासहीत घेतली जाईल. यासाठी शेतकरी मोठे आंदोलन करणार आहेत. दोघट मध्ये बुधवारी राजेंद्र चौधरीयांच्या निवासस्थानी भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत बोलत होते. ते म्हणाले की, साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची थकबाकी वेळेत भागवली जात नाही. यासाठी शेतकर्‍यांना मोठे आंदोलन सुरु करावे लागणार आहे. ते म्हणाले, सरकारने सांगितले होते की, 14 दिवसांच्या आत ऊसाची थकबाकी न भागवल्यास शेतकर्‍यांच्या थकबाकीवर व्यजही देणे आवश्यक आहे. जोपर्यंत हे लागू होणार नाही तोपर्यंत कारखाने पैसे देण्यात उशिर करतच राहणार.

त्यांनी सांगितले की,ऊस कारखान्यांनी प्रचार केला आहे, शेतकर्‍यांचा 30 टक्के ऊस यावेळी कमी घेतला जाईल. पण शेतकर्‍यांनी नाराज होवू नये, कारखान्याला शेतकर्‍यांचा एक एक ऊस घ्यावा लागेल. शेतकर्‍यांसाठी कारखाने तसेच ऊस समित्यांकडून पासबुक देणे आवश्यक आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या ऊसाचा हिशेब असेल की, थकबाकी 14 दिवसांच्या आत भागवली आहे की नाही. 14 दिवसांनंतर भावगण्यात आलेल्या थकबाकीवर शेतकरी व्याज घेईल. या ठिकाणी माजी अध्यक्ष धमेंद्र राठी, रामकुमार, देवेंद्र पवार, मनोज, राजेंद्र आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here