छत्तीसगड मध्ये तांदुळ, ऊसापासून इथेनॉल उत्पादनासाठी प्लांट उभा करणार: मुख्यमंत्री

रायपूर: छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दावा केला की, त्यांच्या सरकारच्या दीड वर्षाच्या प्रयत्नांनंतर केंद्र सरकारने तांदळापासून इथेनॉल उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, तांदुळ आणि ऊसापासून इथेनॉलच्या उत्पादनासाठी छत्तीसगड मध्ये प्लांट उभारले जातील .

बघेल यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यामध्ये तांदळापासून इथेनॉल बनवण्याच्या छत्तीसगड सरकारच्या मागणीवर टीका करणारे आता निराश झाले आहेत. कारण याला केंद्र सरकारनेही स्विकारले आहे. बघेल यांच्यानुसार, यामुळे छत्तीसगड आणि देशाच्या बाकीच्या भागात लाखो शेतकर्‍यांना फायदा होईल आणि मूल्यवान विदेशी मुद्रा वाचवण्यामध्ये मदत मिळेल. इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here