साखर कारखान्यांसाठी कठीण वेळ

नवी दिल्ली : चीनी मंडी

लॉक डाउन मुळे कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम आणि मिठाई ची दुकाने बंद झाल्यामुळे साखरेची मागणी घटली आहे. मागणी घटल्यामुळे साखर कारखाने आव्हानात्मक मार्गावरून जात आहे. लॉक डाउन मुळे मोलासिस, स्पिरिट आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA) सारख्या साखर उत्पादनाची मागणी ठप्प झाली आहे. पेपर कारखान्यांच्या शटडाउन ने बगॅसच्या मागणीला कमी केले आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल सह मिश्रित होण्यासाठी इथेनॉल ची मागणी कमी केली आहे. तेल विपणन कंपन्यांनी सांगितले की, लॉक डाउन च्या दरम्यान पेट्रोल पंप बंद राहिले, ज्यामुळे इंधनाचा वापरही कमी झाला आहे.

साखर आणि त्याची उत्पादने या दोन्हीच्या मागणीत झालेल्या कमीमुळे कारखाने नाजूक स्थितीतून जात आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखाने उत्तर प्रदेशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत. महाराष्ट्रात ऊस उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे कारखान्यांसमोर साखर आणि त्यांची उत्पादने दोन्हीची ही अतिरिक्त साठ्याची समस्या कमी आहे, कारण उत्तर प्रदेशाच्या तुलनेत इनवेटरी कमी आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील कारखाने ऊसाच्या मोठया उत्पादनामुळे साखर आणि बाय प्रोडक्ट उत्पाादनांच्या व्यवस्थापनाासाठी संघर्ष करत आहेत.

साखर उद्योगातील समस्या पाहता, साखर कारखान्यांच्या संघटनांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here