भारत बंदमुळे वाहतूक कोंडी; शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्र्वभूमीवर सोमवारी दिल्ली पोलिसांनी मुख्य रस्ते बंद केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. त्यामुळे शहराच्या अनेक विभागांत वाहतूक कोंडीची भर पडली. दिल्ली पोलिसांनी शहराच्या सीमेवर सुरक्षेसाठी तपासणीतही वाढ केली. त्यामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झाली.

पोलिसांनी ट्विटरवरून रस्ते वाहतूक बंद असल्याची माहिती दिली. ऐतिहासिक लाल किल्ला परिसर आणि गाजीपूर सीमा परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. लाल किल्ल्याच्या दोन्ही बाजूला रेल्वे आणि सुभाष रोडवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे ट्विट पोलिसांनी केले. वाहतूक पोलिसांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनामुळे गाजीपूर सीमेवरून होणारी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली यादरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी डीएनडी फ्लायवे, विकास मार्ग आणि सिग्नेचर रोड तसेच वजीराबाद रोडचा वापर करावा.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here