यंदा साखर उद्योगातील उलाढाल स्थिर राहण्याची अपेक्षा: डीसीएम श्रीराम

मुंबई : यंदा साखर उद्योगातील उलाढाल स्थिर राहण्याची अपेक्षा आहे असे डीसीएम श्रीरामचे अध्यक्ष आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक अजय श्रीराम यांनी सांगितले. ग्रामीण भागातून पुन्हा मागणी वाढत असल्याचेही श्रीराम यांनी स्पष्ट केले.

सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे दिले आहेत. त्याचा ग्रामीण भागावर चांगला परिणाम झाला आहे. शेतीच्या स्तरावर हे वर्ष स्थिर राहील. पुढील कालावधीत साखर स्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण, उसाची लागण समाधानकारक आहे.

डीसीएम फर्मच्या व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणाले, फर्म आपल्या इथेनॉल उत्पादन क्षमतेचा प्रती दिन १,२०,००० लिटरपर्यंत विस्तार करणार आहे. याची सुरुवात खराब तांदुळापासून करण्याचे प्रयत्न आहेत. कारखान्याच्या परिसरात तांदळाचे क्षेत्र प्रचंड असल्याचे श्रीराम यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही याच तांदळाचा वापर करू आणि प्रती दिन १,२०,००० लिटर क्षमतेचा प्लांट सुरू करणार आहे. हा प्लांट १०-१२ महिन्यांत सुरू होऊ शकेल.

डीसीएम श्रीराम कंपनीने चालू आर्थिक वर्षात जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत दुप्पट निव्वळ नफा मिळवला आहे. हा नफा १५७.५ कोटीपर्यंत पोहोचला आहे. गेल्यावर्षी आर्थिक वर्षातील समान कालावधीत ७०.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here