गावांसह शहरांमध्येही गतीने वाढली बेरोजगारी

बेरोजगारीच्या आघाडीवर अडचणी कमी होत असताना दिसत नाहीत. सीएमआयईच्या अहवालानुसार २५ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर वाढून ७.१४ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात १८ जुलै रोजी तो ५.९८ टक्क्यांवर होता. याशिवाय ग्रामीण स्तरावर आणि शहरांमध्येही बेरोजगारीत गतीने वाढ होत आहे.

या अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत शहरी विभागात बेरोजगारी वाढून ८.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर १८ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात ही बेरोजगारी ७.९४ टक्के होते. ग्रामीण बेरोजगारी ६.७५ टक्क्यांवर आली असून ती यापूर्वी ५.१ टक्क्यांवर होती. अहवालात म्हटले आहे की, महागाईच्या मासिक दरात घट दिसून आली असून ती दिलासादायक बाब आहे. जून महिन्यात बेरोजगारीचा दर घटून १० टक्क्यांखाली आला. अहवालात म्हटले आहे की, जून महिन्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर घटला आहे.
यादरम्यान नोमुराचा इंडिया बिझनेस रिजक्शन इंडेक्स ९५.३ टक्के राहिला. यापूर्वी गेल्या आठवड्यात तो ९६.४ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, हा दर अद्याप कोरोनापूर्व काळाच्या खालच्या स्तरावर आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here