केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला

मुंबई: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांना सांगितले की, कारखान्यानि साखरे ऐवजी इथेनॉल मध्ये विविधता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पश्चिम महाराष्ट्र भाजपा च्या वतीने आयोजित जनसंवाद ऑनलाईन रॅली ला संबोधित करताना गडकरी म्हणाले, सध्या इथेनॉल उद्योगाचा एकूण कारभार 20,000 करोड़ रुपये आहे, हा वाढवून 1 लाख करोड़ रुपये करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.

अतिरिकत साखर उत्पादन साखर कारखाने आणि ऊस शेतकरी दोघांसाठीही संकटच आहे. आंतरराष्ट्रीय साखरेच्या किंमतीमध्ये आणि आमच्या साखरेच्या किमतीत फरक आहे. केंद्र सरकार सब्सिडी देते, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. इथेनॉल च्या बाजारात अधिक संभावना आहेत आणि साखर कारखान्यांना यावर काम करणे आवश्यक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here