लॉकडाउनमुळे अनकापल्ले गुळ बाजारात शुकशुकाट

लॉकडाउनमुळे अनाकापल्ले गुळ बाजारात शुकशुकाट

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशामध्ये गुळाचा हंगाम संपला आहे. पण लॉकडाउन ने देशाच्या दुसरा मोठा गुळाचा बाजारा अनाकापल्ले मध्ये गुळाचा पुरवठा थांबला आहे. 22 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत गुळाचा बाजार बंद राहीला. त्यानंतर, आठवड्यामध्ये दोन वेळा बाजार खुला झाला, पण गेल्या हंगामाच्या तुलनेत गुळाच्या ढेपेच्या पुरवठ्यामध्ये कमी राहिली. लॉकडाउनमुळे गुळ व्यापार्‍यांना सुरुवातीला ओडिसा, झारखंड, पश्‍चिम बंगाल आणि काही इतर राज्यांमध्ये परिवहनावर घातलेल्या प्रतिबंधामुळे गुळाच्या पुरवठ्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

15 एप्रिल आणि 20 मे दरम्यान 10.9 करोड रुपयापेक्षा अधिक कारभारासह 2.18 लाखपेक्षा अधिक गुळ (3,271 टन) मिळाला. अनाकापल्ले बाजाराला 2016-2017 मध्ये 146 करोड रुपयांचा 48,060 टन गुळ मिळाला, तर 2017-18 मध्ये हे 35,498 टन (99 करोड रुपये) आणि 2018-19 मध्ये 33,509 टन (91 करोड रुपये) होते. लॉकडाउन मुळे गुळ तयार करण्यामध्ये विलंब झाल्यामुळे बाजार 6,000 ते 7,000 टनापेक्षा अधिक गुळ मिळवण्यात अपयशी राहिला. व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, आम्हाला आशा आहे की, सणाच्या हंगामात इतर राज्यातून गुळाची मागणी वाढू शकते. जर अनाकापल्ले गुळाची मागणी कमी होत गेली तर, आमचे मोठे नुकसान होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here