यूपी सरकारने ऊस उत्पादनात परिवर्तन घडवून साखर उद्योग नव्या उंचीवर नेला: मंत्री सिंह

लखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमध्ये ऊस शेतीमध्ये परिवर्तन घडवत साखर उद्योगाला नव्या उंचीवर पोहोचले आहे असे प्रतिपादन वरिष्ठ मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केले. अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात जिथे साखर कारखाने विक्री केले जात होते, तिथे आमच्या सरकारने बंद पडलेले साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन केले. आणि

११९ साखर कारखाने कोरोनासारख्या संकट काळातही सुरळीत चालू आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, राज्यात योगी सरकारने कोणाशीही भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे.

इथेनॉलविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यात गव्हाची उच्चांकी खरेदी आणि पैसे दिले गेले आहेत. आता उत्तर प्रदेश इथेनॉल उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here