गाळप हंगाम संपल्यानंतरही साखर कारखाने सुरु ठेवणार सॅनिटायजर उत्पादन

लखनऊ: उत्तर प्रदेशात कोरोना वायरस मुळे हॅन्ड सॅनिटायजरजी मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एका महिन्यामध्ये सॅनिटायजर उत्पादन क्षमतेमध्ये प्रति दिन 40,000 लीटर पासून जवळपास 2 लाख लीटर पर्यंत वाढ झाली आहे. राज्यात काही साखर कारखान्यांनी सॅनिटायजर बनवण्यासाठी संयंत्र स्थापन केले आहेत. उत्तर प्रदेशचे प्रमुख सचिव (ऊस)संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यामध्ये 82 प्लांट सॅनिटायजर च्या व्यावसायिक उत्पादनात उतरले आहेत. आणि यामध्ये 36 यूनिट सॅनिटायजर प्लांट, 27 साखर कारखाने, 11 डिस्टलरी आणि आठ इतर यूनिट यांचा सहभाग आहे. त्यांनी सांगितले, यापूर्वी यूपी मध्ये सैनिटायजर उत्पादन करणारे केवळ 5-6 स्थायी प्लांट होते आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये ही संख्या वाढून 36 झाली आहे. ऊस विभागाकडून पोलिस, चिकिस्ता आणि आरोग्य कर्मचारी आणि स्थानिकांना मोफत सॅनिटायजरचा पुरवठा केला जात आहे.

आता राज्यामध्ये 2019-20 ऊस गाळप हंगाम सुरु आहे, तर सॅनिटायजर उत्पादनात व्यग्र असूनही साखर कारखाने गाळप संपल्यानंतर ही उत्पादन सुरु ठेवण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांना इथेनॉल, अल्कोंहोल यांची आवश्यकता लागेल, जी त्यांच्याकडे पूर्वीच मोठ्या प्रमाणात आहे. यूपी मध्ये आतापर्यंंत 119 पैकी 32 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here