उत्तर प्रदेशमध्ये गत हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत कमी साखर उत्पादन

उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गळीत हंगामात काही दिवसांचा उशीर झाला आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, सध्या ७४ साखर कारखान्यांनी या हंगामात गाळप सुरू केले आहे. १५ नोव्हेंबरअखेर २.८८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात १५ नोव्हेंबर २०२० अखेर ४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट दिसून आली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार साखर कारखाने आता ऊस गाळपात गती घेऊ शकतात. जर देशाचा विचार केला तर सध्या २०२१-२२ या हंगामात १५ नोव्हेंबरअखेर २०.९० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी, याच कालावधीपर्यंत १६.८२ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here