लखनौ : योगी आदित्यनाथ सरकारने २०२०-२१ या गळीत हंगामातील २६०६१.५७ कोटी रुपये उच्चांकी ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. कोरोना महामारीमुळे साखरेच्या खपात घट झाली असूनही राज्यात उच्चांकी पैसे देण्यात आली आहेत. ऊस विभागाने दिलेल्या माहितीनुसार ७८.९२ टक्के ऊस बिलांचे वितरण झाले आहे.
राज्यात १२० साखर कारखाने असून त्यापैकी ९२ खासगी मालकीचे आहेत. तर २४ सहकारी आहेत. तीन कारखाने युपी साखर संघाकडून चालवले जातात. ३९ कारखान्यांनी २०२०-२१ हंगामातील १०० टक्के ऊस बिले दिली आहेत. तर २६ कारखान्यांनी ८० टक्के पैसे दिले आहेत.
ऊस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, विभागाने केलेल्या अनेक उपायांनंतर उच्चांकी ऊस बिले अदा झाली आहेत. इथेनॉल उत्पादन आणि विक्रीत झालेल्या वाढीनंतर पैसे देण्यात गती आली आहे. २०१७ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सरकारन एस्क्रो खाते तयार केले आहे. त्याचे व्यवस्थापन कारखान्यांचे प्रतिनिधी, जिल्हा ऊस अधिकारी, वरिष्ठ ऊस विकास निरीक्षकांकडून संयुक्तरित्या केले जाते. त्यामुळे खात्यात जमा होणाऱ्या पैशातील ८५ टक्क पैस शेतकऱ्यांसाठी ठेवले जातात. परिणामी उसाचे पैसे देण्यासह इतर कारणांसाठीही पैसे खर्च केले जाऊ शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link