उत्तर प्रदेश ऊस विभाग शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी सज्ज: ऊस आयुक्त

लखनौ : उत्तर प्रदेश ऊस आणि साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकार ऊस शेतकर्‍यांच्या सर्वागिण उन्नतीसाठी कटीबद्ध आहे. त्यांनी सांगितले की, याबाबत ऊस शेतकर्‍यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना ऊसाच्या शेतीचे नवे वैज्ञानिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गेल्या तीन वर्षांंपासून ऊस विकास विभागाकडून अनेक ठोस पावले उचलली गेली आहेत. विभागाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील लाखो ऊस शेतकर्‍यांना लाभ झाला आहे.

राज्य सरकार म्हणाले की, ऊस थकबाकी बाबत सरकार गंभीर आहे. ज्यामुळे राज्यातील अनेक कारखान्यांकडून थकबाकीही भागवली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या कुशल नेतृत्वामध्ये सध्या सरकारचे गठन झाल्यानंतर मंत्री साखर उद्योग तथा ऊस विकास सुरेश राणा यांच्या दिशा निदर्शशांनुसार प्रदेशातील ऊस शेतकर्‍यांच्या थकबाकी भागवण्यला प्राध्यान्य देवून 2017-2020 च्या मध्ये आतापयंंत ऊस शेतकर्‍यांना 1,00,000 करोड रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here