उत्तराखंड: साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्याची मागणी

खटीमा : भारतीय किसान युनियनच्या चढूनी ग्रुपने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कारखाना सुरू ठेवण्याची मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे. लवकर हंगाम समाप्त केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खटिमातील शेतकऱ्यांकडे अद्याप जवळपास एक लाख क्विंटल ऊस शिल्लक आहे. आणि सितारगंज साखर कारखान्याने ३१ मार्च रोजी गळीत हंगाम समाप्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे खटिमातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर कारखाना बंद झाला तर आपला ऊस कोठे न्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कारखाना सुरू ठेवावा अशी मागणी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मनजिंदर सिंह भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. युनियनची मागणी अशी आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या पाहता यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. यावेळी सुमित, संदीप, हरवंश, रमाकांत, मुसाफिर आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here