ऊस बिलांसह विविध मागण्यांबाबत भाकियूचे निवेदन

भारतीय किसान युनीयनच्यावतीने अम्बावता येथे झालेल्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलांसह विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तहसिलदार कार्यालयात भारतीय किसान युनीयन अम्बावताची बैठक जिल्हाध्यक्ष चौधरी शिवकुमार सहरावत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा उपाध्यक्ष जावेद सिद्दीकी यांनी संचलन केले.

बैठकीत शेतकऱ्यांनी ऊस बिले मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष चौधरी शिवकुमार सहरावत म्हणाले की, सरकार साखर कारखानदारांच्या हातातील कठपुतळी बनले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही. त्यामुळे भाकियू अम्बावताच्यावतीने जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन केले जाईल. बैठकीत जिल्हा महासचिव डोरी पहिलवान, महिपाल सिंह, उदय भान सिंह, अब्दुल, राम सिंह, नौशाद, मुकुल, विपिन त्यागी, निखिल कुमार, जीत सिंह आदींची भाषणे झाली. युनियनकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे १५ मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. ऊस बिले व्याजासह मिळावी, कालव्यांमध्ये पाणी सोडावे, रस्ते दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीज बिल माफी द्यावी अशा मागण्यात करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here